सरपंच संसदचे उद्दिष्ट प्रत्येक तालुका स्तरावर आदर्श गावांची निर्मिती करणे आहे. महात्मा गांधींनी मांडलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरण आणि ग्रामीण सक्षमीकरणाच्या संकल्पनेनुसार ही आदर्श विकसित गावे घडविण्यात येतील.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा “शंकराचार्य” असून, तो ग्रामसभा आणि पंचायत समिती/जिल्हा परिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मध्ये करण्यात आलेल्या नवीन सुधारणांमुळे जनतेमधून सरपंचाची थेट निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकाच व्यासपीठावर कृषी क्षेत्रातील समस्या, ग्रामविकासातील महिलांची भूमिका, जलव्यवस्थापन, ग्रामीण विकासासाठी निधीचे नियोजन, CSR आणि विविध शासकीय योजना आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात येतो.