top of page

राष्ट्रीय सरपंच संसद 

राष्ट्रीय सरपंच संसद ही स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित संवाद, माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी निर्माण केलेले एक अग्रगण्य शैक्षणिक व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली असली तरी भारतातील अनेक गावांमध्ये अजूनही सर्वांगीण विकास ही तातडीची गरज आहे.

या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि भावी नेतृत्वाला ग्रामीण प्रश्नांची सखोल समज देण्यासाठी, MIT WPU च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘रूरल इमर्शन’ हा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध गावांमध्ये काम करण्याची, ग्रामस्थ व सरपंचांशी थेट संवाद साधण्याची आणि ग्रामीण समाजासमोरील आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळते.

सरपंच संसद या प्रयत्नाला पुढे नेत, सरपंचांचे सक्षमीकरण आणि सर्व सहभागींच्या मुक्त संवादाला प्रोत्साहन देते. या व्यासपीठाद्वारे व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील सकारात्मक उपक्रम आणि समस्या सोडविण्याच्या प्रयत्नांविषयी जाणून घेण्याची अनोखी संधी मिळते. आपली कामगिरी मांडताना ते ज्ञानाची देवाणघेवाण करतात आणि चर्चेद्वारे आपली दृष्टी व्यापक करतात.

‘India’ आणि ‘Bharat’ यांतील दरी कमी करण्याची दृष्टी आणि अधिक आदर्श गावांची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून, राष्ट्रीय सरपंच संसद हा प्रगतीकडे नेणारा एक महत्त्वपूर्ण अपराजकीय उपक्रम आहे

Sarpanch-Sansad-03.png
DSC_7338.JPG

आमची उद्दिष्टे

राष्ट्रविकासासाठी गावांचे सक्षमीकरण

स्थानिक नेतृत्व विकसित करणे

ग्रामीण विकास

कार्याक्षेत्र 

भारतातील एकूण २८ राज्ये व ८ केंद्र शासित प्रदेश आहेत. यापैकी त्रिस्तरीय व द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे अशी २५ राज्ये व १ केंद्र शासित प्रदेश हे ‘राष्ट्रीय सरपंच संसद’चे कार्यक्षेत्र आहे.

पंचायतराज व्यवस्था असणारे भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश

पंचायतराज व्यवस्था असणारे भारतीयातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश

कार्यपद्धती 

  • ‘राष्ट्रीय सरपंच संसद’चे कार्यक्षेत्र असणाऱ्या भारतातील २९ राज्ये व ८ केंद्र शासित प्रदेश यामध्ये विविध उपक्रमांचे राज्यस्तरीय समन्वयक ठरविण्यात आले.

  • समन्वयकांची निवड करून त्यांना सरपंच कार्यक्षेत्र नेटवर्कशी संलग्न करण्यात येत आहे. निवड करण्यात आलेल्या व्यक्तींना निमंत्रण व ओळखपत्र देण्यात येते.

  • राष्ट्र, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर प्रत्येक पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते.

  • नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय सहाय्याने ‘राष्ट्रीय सरपंच संसद’च्यावतीने ग्रामीण लोकप्रतिनिधींच्या सशक्तीकरणासाठी विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येते.

  • लोकप्रतिनिधींच्या सबलीकरणाबरोबरच पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपक्रम

‘राष्ट्रीय सरपंच संसद’च्यावतीने प्रथम पुढील उपक्रमांची आखणी आणि नियोजन करण्यात आले आहे.​

about-area.jpg

संसद

०१. राष्ट्रीय स्तर - सरपंच संसद
०२. राज्यस्तरीय - सरपंच संसद
०३. जिल्हा स्तरीय - सरपंच संसद
०४. तालुका स्तरीय - सरपंच संसद

1

2

संवाद

०१. सरपंच - माध्यम व संवाद
०२. सरपंच - केंद्र शासन व प्रशासन ८ धोरण संवाद
०३. सरपंच - राज्य शासन व प्रशासन ८ धोरण संवाद
०४. सरपंच - जिल्हा शासन व प्रशासन ८ धोरण संवाद
०५. सरपंच - शेतकरी - शासन ८ संवाद

कार्यक्रम

०१. राष्ट्रीय सरपंच संसद - ग्राम
०२. मासिक ‘सरपंचश्री’ - प्रकाशन
०३. वृक्षारोपण महायज्ञ
०४. सरपंच - आरोग्यकार्ड
०५. एक ग्रामपंचायत - एक उद्योजक

3

अभ्यासदौरा

०१. सरपंच - परदेश अभ्यासदौरा
०२. सरपंच - परराज्य अभ्यासदौरा
०३. सरपंच - राज्यांतर्गत अभ्यासदौरा

पुरस्कार

०१. आदर्श ग्राम - पुरस्कार
०२. आदर्श सरपंच - पुरस्कार
०३. आदर्श सरपंच - ग्रामपंचायत अधिकारी ८ संयुक्त पुरस्कार
०४. स्व. सौ. उर्मिलाताई कराड - आदर्श ग्रामीण विकासकार्य महिला - पुरस्कार
०५. आदर्श ग्रामीण प्रशासक - पुरस्कार

प्रशिक्षण

०१. आदर्श ग्रामनिर्मिती आराखडा निर्मिती - प्रशिक्षण
०२. सी. एस. आर. निधी - संकलन व व्यवस्थापन - प्रशिक्षण
०३. सरपंच - व्यक्तिमत्व व वक्तृत्व - प्रशिक्षण

निर्मिती

०१. आदर्शग्राम - विकासगती निर्मिती
०२. आदर्श सरपंच पुरस्कार - विजेतेपद निर्मिती

विशेष उपक्रम

संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी १७ उद्दिष्टे निश्चित केली आहेत.
भारताच्या केंद्र शासनाच्या ‘ग्रामीण विकास मंत्रालय’ आणि ‘पंचायती राज मंत्रालय’ यांनी ही शाश्वत विकास उद्दिष्टे ग्रामपंचायतीस्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिकीकरण करून ग्रामीण विकासाची पुढील ९ उद्दिष्टे स्वीकारली आहेत.

sarpanch-sansad.jpg

विशेष उपक्रम

०१. दारिद्र्यमुक्त व उपजीविकायुक्त समृद्ध गाव
०२. निरोगी गाव
०३. बालस्नेही गाव
०४. जलसंपन्न गाव
०५. स्वच्छ व हरित गाव
०६. पायाभूत सुविधांनी स्वयंपूर्ण गाव
०७. सामाजिकन्यायाच्या सुरक्षित व न्याय्य गाव
०८. सुशासन असलेले गाव
०९. महिला स्नेही गाव

शाश्वत विकासाच्या ९ उद्दिष्टांतील एक उद्दिष्ट समोर ठेवून भारतातील ज्या ग्रामपंचायतींनी ते उद्दिष्ट यशस्वी केले आहे त्यांना केंद्र शासनाचा ‘पंचायतराज विभाग’ ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार’ देऊन गौरवान्वित करतो. देशातील सरपंचांना दिशादर्शक व आदर्श असणाऱ्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार’ प्राप्त ग्रामपंचायतींच्या कार्याची प्रसिद्धी, त्यांचा स्वीकार करण्याचे व त्या शिकवणींचा सर्वत्र प्रसार करण्याचा विशेष उपक्रम ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ ने निश्चित केला आहे.

bottom of page